
वैभव ११ संघ मोठीवाडी यांच्या वतीने प्राथमिक शाळा पांगरी नं. २ शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप झाले.
- प्रतिनिधी : संगमेश्वर : प्रमोद तरळ :- शाळा ही नुसती शाळा नसून ते एक विद्यार्थी घडविण्याचे केंद्र असते. आद र्श शाळेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगला, अनुभवी, प्रेमळ शिक्षक वर्ग -शिकवणारे शिक्षक आदर्श असतील तर शाळासुद्धा आदर्श बनते आणि अशा शाळेत विद्यार्थ्यां ना खेळीमेळीच्या वातावरणात शिकविण्याचे काम सुरू असते.
- चांगल्या शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा वि कास ज्या शाळेत होतो ती आदर्श शाळा ठरते. कारण फक्त शिक्षण घ्यायचे असेल तर ते कुठेही मिळते.
- पण विद्यार्थ्यांमधील खेळाडूवृत्ती, कला, संशोधक वृत्ती इ. बऱ्याच गुणांना वाव मिळवून देण्यासाठी मंच तयार करू न देणे व त्यांना योग्य व्यक्तीकडून योग्य वेळी मार्गदर्शन करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. शाळा यासाठी सर्व तोप री ज्ञान देते म्हणून आम्ही उभे आहोत.!
- पांगरी गावातील आमची मराठी शाळा ही आमच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे.
- त्या भावनेनी ऋणानुबंधानी आणि त्या उद्देशांनी एकत्र येऊन दरवर्षी प्रमाणे यावेळी ही वैभव ११ संघाच्यावतीने गावातील शाळेतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
- वैभव ११ संघ मोठीवाडीने खेळासोबत सामाजिक बांधि लकी जपत आपल्या मधील खेळाडू वृत्तीचे समाजाला दर्शन घडवले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/