नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नीती आयोगाच्या माध्यमातून मुंबईचा विकास करण्याचा निर्णय हा मुंबई गिळंकृत करण्याचा भयंकर डाव : संजय राऊत. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

नीती आयोगाच्या माध्यमातून मुंबईचा विकास करण्याचा निर्णय हा मुंबई गिळंकृत करण्याचा भयंकर डाव : संजय राऊत.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : नितीन राने :- नीती आयोगाच्या माध्यमातून मुंबईचा विकास करण्याचा निर्णय हा मुंबई गिळंकृत करण्याचा आणि लुटण्याचा भयंकर डाव असल्याचा आहे,असा आरोप खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केला.
  • उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर, केंद्र सरकारला हा निर्णय घेता आला नसता. त्यामुळे शिवसेनेत फूट पाडून सत्ता ताब्यात घेण्यात आल्याचेही ते या वेळी म्हणाले.
  • ते म्हणाले, ‘‘मुंबईला केंद्रशासित प्रदेश करणे आणि मुंबईवर महाराष्ट्राचा अधिकार राहू नये यासा ठीच नीती आयोग विकास करणार हा नवीन फंडा शोधून काढण्यात आला आहे.
  • केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला मुंबई गिळायची आहे. मुंबईचा विकास करण्यासाठी नीती आयोगा ची आवश्यकता नाही. त्यासाठी महाराष्ट्र सक्षम आहे.
  • मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी राहू नये यासाठी दहा वर्षांपासून मोदी सरकार प्रयत्न करत आहे. त्यांनी सुरुवातीला मुंबई कमजोर केली.
  • मुंबईतील व्यवसायांची आंतरराष्ट्रीय कार्यालये गुजरातमध्ये खेचून नेली. मुंबईच्या विकासाची जबाबदारी महापालिका, महाराष्ट्र सरकारची आहे.
  • आम्ही निष्ठा विकल्या नाहीत
  • खासदार संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी शिवसेना पक्ष सोडण्यासाठी शंभर कोटींची ऑफर असल्याचा दावा केला होता.
  • या संदर्भात बोलताना खासदार राऊत म्हणाले, की आमच्यासह अनेकांना ऑफर आल्या. आम्हाला फोन आले, दबाव होता.
  • परंतु, आम्ही फुटलो नाही, तुरुंगात गेलो. आम्ही आमच्या निष्ठा विकल्या नाहीत. शिवसेना सोडून गेलेल्यांना २०२४ मध्ये पश्चात्ताप होईल.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा