नीती आयोगाच्या माध्यमातून मुंबईचा विकास करण्याचा निर्णय हा मुंबई गिळंकृत करण्याचा भयंकर डाव : संजय राऊत.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : नितीन राने :- नीती आयोगाच्या माध्यमातून मुंबईचा विकास करण्याचा निर्णय हा मुंबई गिळंकृत करण्याचा आणि लुटण्याचा भयंकर डाव असल्याचा आहे,असा आरोप खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केला.
- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर, केंद्र सरकारला हा निर्णय घेता आला नसता. त्यामुळे शिवसेनेत फूट पाडून सत्ता ताब्यात घेण्यात आल्याचेही ते या वेळी म्हणाले.
- ते म्हणाले, ‘‘मुंबईला केंद्रशासित प्रदेश करणे आणि मुंबईवर महाराष्ट्राचा अधिकार राहू नये यासा ठीच नीती आयोग विकास करणार हा नवीन फंडा शोधून काढण्यात आला आहे.
- केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला मुंबई गिळायची आहे. मुंबईचा विकास करण्यासाठी नीती आयोगा ची आवश्यकता नाही. त्यासाठी महाराष्ट्र सक्षम आहे.
- मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी राहू नये यासाठी दहा वर्षांपासून मोदी सरकार प्रयत्न करत आहे. त्यांनी सुरुवातीला मुंबई कमजोर केली.
- मुंबईतील व्यवसायांची आंतरराष्ट्रीय कार्यालये गुजरातमध्ये खेचून नेली. मुंबईच्या विकासाची जबाबदारी महापालिका, महाराष्ट्र सरकारची आहे.
- आम्ही निष्ठा विकल्या नाहीत
- खासदार संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी शिवसेना पक्ष सोडण्यासाठी शंभर कोटींची ऑफर असल्याचा दावा केला होता.
- या संदर्भात बोलताना खासदार राऊत म्हणाले, की आमच्यासह अनेकांना ऑफर आल्या. आम्हाला फोन आले, दबाव होता.
- परंतु, आम्ही फुटलो नाही, तुरुंगात गेलो. आम्ही आमच्या निष्ठा विकल्या नाहीत. शिवसेना सोडून गेलेल्यांना २०२४ मध्ये पश्चात्ताप होईल.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space