अजित पवार यांची १० सप्टेंबरची उत्तरदायित्व सभा रेकॉर्ड ब्रेक होईल : हसन मुश्रीफ
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : समाधान चव्हान : ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांची १० सप्टेंबरची उत्तरदायित्व सभा रेकॉर्ड ब्रेक होईल’, असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
- कोणत्याही सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी सभेचे आयोजन नसून, जिल्ह्या तील प्रलंबित प्रश्नांवर मार्ग काढणारी ही सभा ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
- सभेच्या तयारीसाठी बोलावलेल्या राष्ट्रवादी काँग्रे स पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व तालुक्यांमध्ये बैठका घेवून ही सभा यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना केल्या.
- मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘अजित पवार यांना अडच णीत आणण्याचा प्रयत्न झाला. यावेळी आपल्या सह काही प्रमुख नेत्यांनी श्री. पवार यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला.
- या निर्णयाबाबत वेळोवेळी स्पष्ट माहिती देण्यात आली असून, आपल्या साठी हा विषय संपला आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर श्री.पवार पहिल्यां दाच जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
- जिल्ह्यातील अनेक प्रश्नांची माहिती त्यांना आहे. थेट पाईपलाईनचा प्रश्न त्यांनीच मार्गी लावला. तसेच अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, उच्च न्यायालयाचे खंडपीठ असे काही प्रमुख विषय प्रलंबित आहेत.
- हे विषय मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्या सभेचा उपयोग होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
- आमदार राजेश पाटील यांनीही उत्तरदायित्व सभेसाठी मतदारसंघात मेळावे आयोजित केल्याचे सांगितले. मोठ्या संख्येने जिल्ह्यातील जनता या मेळाव्याला उपस्थित राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- माजी आमदार के.पी.पाटील म्हणाले, ‘मी राष्ट्रवादी च्या अजित पवार गटासोबतच आहे. हसन -किसन ची जोडी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही.
- राष्ट्रवादीचे काही कार्यक्रम घेण्यात आले, मात्र त्याचे निमंत्रण नसल्याने उपस्थित नव्हतो. अजित पवार यांना ताकद देण्यासाठी हसन मुश्रीफ यांना अगोदर ताकद देणे आवश्यक आहे.’
- आदिल फरास यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकी स जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, भैय्या माने, युवरा ज पाटील, मानसिंग गायकवाड, बाबासाहेब पाटी ल आसुर्लेकर आदी उपस्थित होते.
- रॅली, गावागोवी फलकांनी स्वागत
- अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यां दाच जिल्ह्यात जाहीर सभेसाठी येत आहेत. त्यामुळे शहरात त्यांची भव्य रॅली काढण्यात येणार आहेत.
- सर्वत्र स्वागत कमानी उभारल्या जाणार आहेत. ठि कठिकाणी बॅनर तसेच गावागावातही अशाच पध्द तीने बॅनर लावून जंगी स्वागत करण्यात येणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
- मुंडेंच्या सभेसारखी परिस्थिती नको
- सभेला येताना कार्यकर्ते आपली वाहने दूर लावता त आणि प्रमुखांची भाषणे झाली की लोक निघून जातात. धनंजय मुंडे यांच्या सभेत मुंडे यांचे भाष ण झाल्यानंतर लोक निघून गेले.
- अशी परिस्थिती येणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना मुश्रीफ यांनी केली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space