दरवर्षी सरासरी २०० दिवसांची बंदोबस्त ड्यूटी; मात्र कुटुंबासाठी.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : सचीन गीरी :- सभा, मोर्चा, आंदोल ने, सण-उत्सव, मंत्र्यांचे (व्हीआयपी) दौरे याठि काणी पोलिसांना बंदोबस्ताची ड्यूटी असते. वर्षात सरासरी २०० दिवस पोलिसांना बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागत आहे.
- त्यानंतर आपल्याकडील गुन्ह्यांचा तपास वेळेत लावणे, पुन्हा रात्रगस्ती अशा कारणांमुळे पोलिसां ना कुटुंबासाठी पुरेसा वेळ देता येत नसल्याची स्थिती आहे.
- बंदोबस्त, गुन्ह्यांचा तपास आणि कौटुंबिक जबाब दारी, याचा मेळ बसत नसल्याने अनेकजण तणा वाखाली असल्याचे बोलले जात आहे.
- राज्यातील सत्तासंघर्षामुळे नेत्यांच्या कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात सभा होत आहेत. त्यातच पुन्हा विविध विषयावरून आंदोलने, मोर्चे सुरुच आहेत.
- त्यामुळे पोलिसांना तपासकाम बाजूला ठेवून वारं वार बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागत आहे.
- आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राज्यभरात राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीही पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतो.
- दरम्यान, आता सण-उत्सवाचा काळ असून पुन्हा ऑक्टोबर पासून निवडणु कीचा बंदोबस्त असणार आहे.
- दिवाळीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां ची शक्यता असून एप्रिलनंतर लोकसभा आणि त्यानंतर विधानसभे ची निवडणूक होईल.
- त्यावेळी देखील पोलिसांना सतत बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागणार आहे. त्यामुळे पोलिस अंमलदारांना कुटुंबासाठी पुरेसा वेळ देत येईना, अशी स्थिती आहे.
- कोरोना काळात त्याचा अनुभव सर्वांनाच आला. सद्य:स्थितीत अंमलदारांना बऱ्याचदा हक्काच्या सुट्या देखील घ्यायला अडचणी निर्माण होत आहेत.
- अंदाजे ३० टक्के अंमलदारांना बीपी, शुगर
- सोलापूरसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील अंदाजे ३० टक्के पोलिस अंमलदार व अधिकाऱ्यांना मधु मेह (शुगर) व उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे चित्र आहे. अनेकांना वेळेत त्याची माहिती देखील होत नाही.
- राज्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणा ऱ्या पोलिसांच्या आरोग्या साठी ठोस उपाययोजनां ची गरज असून गृह विभागाने पोलिस अधिकारी व अंमलदारांची संपूर्ण रिक्त पदे भरण्याची आवश्य कता असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.
- सध्या ४० वर्षांवरील अंमलदारांना वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणीसाठी पाच हजार रुपये मिळतात, तर ४० वर्षांखालील अंमलदारांना वर्षातून एकदाच तेवढी रक्कम मिळते. त्यात वाढ करणे काळाची गरज आहे.
- पोलिसांची अजूनही २० हजार पदे रिक्तच
- गृह विभागाने काही दिवसांपूर्वी १९ हजार पोलिस अंमलदारांची भरती केली. त्यांचे सध्या प्रशिक्षण सुरु असून ते सेवेत दाखल व्हायला अजून १० महिने लागणार आहेत.
- दुसरीकडे अद्याप गृह विभागाकडे १६ ते २० हजार पदे रिक्त आहेत, पण प्रशिक्षणाची सोय नसल्याने त्यांची भरती पुढील टप्प्यात होईल, असे विश्वस नीय सूत्रांनी सांगितले.
- अनेक शहरांचा विस्तार झाला, लोकसंख्याही वाढली, मात्र मनुष्यबळ व पोलिस ठाणी तेवढीच आहेत. त्यामळे एका गुन्ह्यांचा तपास पूर्ण होण्या पूर्वी लगेचच दुसरा गुन्हा त्यांच्याकडे सोपविला जातोय, अशी वस्तुस्थिती आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space