पावसासाठी विद्यार्थ्यांचे श्री.कीर्तेश्वराला साकडे.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : धनंजय गोफने :- येथील नेताजी सुभाष विद्यालय व उच्च महाविद्यालया च्या ८०० ते ९०० विद्यार्थी विद्यार्थिनींनी श्रावण महिन्याचे औचित्य साधून केत्तूर नंबर १ येथील प्राचीन कीर्तेश्वर मंदिराला बुधवार (ता.६) रोजी भेट देऊन महादेवाचे दर्शन घेतले.
- यावेळी विद्यार्थ्यांनी परिसरात अद्यापही मोठा पाऊ स झाला नाही त्यातच उजनी धरणही पूर्ण क्षमतेने भरलेले नाही, त्यामुळे राहिलेल्या पावसाळ्यात तरी भरपूर पाऊस पडू दे ! उजनीच्या जलाशय पूर्ण क्षमतेने भरू दे ! असे साकडे महादेवाला (कीर्तेश्वर) साकडे घातले.
- केत्तूर नं.१ येथे उजनी जलाशयाकाठी प्राचीन महा देव किर्तेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या सभोवताली उजनीचे अथांग पाणी असल्याने परिसर नयनरम्य आहे.
- येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिराचा जिर्णो द्धार करण्याचे काम हाती घेतले आहे. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर पावसा साठी प्रार्थना केली.
- या उपक्रमाचे संयोजन प्राचार्य दिलावर मुलाणी व पर्यवेक्षक भीमराव बुरटे यांनी केले होते.
- उपक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर जाधवर, राम चंद्र मदने, सुभाष सामंत,आत्माराम साबळे, गणेश कोळी, वंतेश कडवे, संदीप हिरवे यांनी परिश्रम घेतले.
- विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण व्हावी या हेतूने या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
- तालुक्यात पावसाची स्थिती गंभीरच
- पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरी पाव साने समाधानकारक हजेरी लावलेली नाही.जिल्ह्या साठी वरदायिनी असणारे उजनी धरण यंदा अजून ही वजा पातळीतच आहे.
- त्यामुळे या चिमुकल्यांनी थेट देवालाच साकडे घालण्यासाठी कीर्तेश्वरचे मंदिर गाठले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space