मनोज जरांग पाटील यांच्या उपोषणाचा 14 वा दिवसः आज सर्वपक्षीय बैठक; मराठा आरक्षणाचा पेच सुटणार का…?
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : संदीप कारके :- जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षणासाठी उपोषण सूरू करण्यात आले आहे.
- आज या उपोषणाचा 14 वा दिवस आहे. राज्य सरकारने आतापर्यंत अनेकदा हे उपोषण सोडण्या साठी प्रयत्न केले आहे.
- मात्र,राज्य सरकारचे सर्व प्रयत्न फेल ठरले आहेत. सरसकट आरक्षणाच्या आपल्या निर्णयावर मनोज जरांगे ठाम आहेत.
- राज्य सरकारच्या वतीने सातत्याने मनोज जरांगे यांच्या सोबत चर्चा सुरू आहे. मात्र, त्यांच्या माग ण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने जरांगे पाटील यांनी आपण उपोषण मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे.
- यात आता मनोज जरांगे यांनी पाणी आणि औषधां ही त्याग केला आहे. तसेच त्यांनी सलाईनही काढले आहे.
- या सर्व पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक बोलाव ण्यात आली आहे. त्यामुळे आरक्षणाचा पेच सुट णार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौदावा दिवस आहे. एक सप्टेंबरला या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.
- पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने आंदोलनाची चर्चा राज्यभर झाली होती. त्यात आता आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे.
- त्यामुळे जरांगे यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्या साठी राज्य शासनाने आतापर्यंत तीन वेळा चर्चा केली आहे.
- मात्र, त्यातून कोणताच तोडगा निघालेला नाही. राज्य सरकारने दोन अध्यादेश देखील काढले आहे त. तरी देखील मनोज जरांगे सरसकट आरक्षणा च्या मुद्यावर ठाम आहेत.
- पाणी-उपचार बंद
- अनेक चर्चेच्या फेऱ्या करुन देखील राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील आढी अद्या प सुटलेली नाही.
- या संदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेला चार दिवसांचा अवधी संपला आहे.
- त्यामुळे त्यांनी पाणी पिणे आणि उपचार घेणे बंद केले आहेत. राज्य शासनाने दोन अध्यादेश काढले. परंतु, ते मान्य नसल्याने परत पाठवले आहेत.
- एकनाथ शिंदे यांनी बोलावली बैठक मराठा आरक्ष णाबाबत तोडगा काढण्यासाठी सोमवारी सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख आणि प्रतिनिधींची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली आहे.
- ही बैठक सह्याद्री अतिथीगृहात होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पुण्यात दिली.
- आरक्षणाच्या मुद्यावर कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे आक्रमक होताना पाहावयास मिळत आहेत.
- त्यांनी पाणी न घेणे आणि उपचारासाठी नकार दिल्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. जरांगे यांच्या या निर्णयामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space