मुंबईहून समुद्रमार्गेच जा आता थेट पालघर; वर्सोवा-विरार सागरी सेतूचा पालघरपर्यंत विस्तार.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : कल्पेश राणे :- वर्सोवा-विरार सागरी सेतूचा थेट पालघरपर्यंत विस्तार करण्याच्या आता ‘एमएमआरडीए’ने हालचाली सुरू केल्या आहेत.
- यापूर्वी वरळी ते वांद्रेनंतर वांद्रे ते वर्सोवा आणि वर्सोवा ते विरार असा टप्प्याटप्प्याने विस्तार कर ण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’ ने घेतला हाेता.
- तसेच याच मार्गाचा पुढे पालघरपर्यंत विस्तार कर ण्याची घोषणा केली हाेती.
- ही घोषणा आता प्रत्यक्षात अंमलात आणण्यासा ठी आता विस्तारित विरार ते पालघरपर्यंतचा सी-लिंकचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्या सह वर्सोवा ते विरार मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे पुनरावलोकन करण्यासाठी सल्लागार नेमण्यासाठी मंगळवारी निविदा मागविल्या.
- हा प्रत्यक्षात पूर्ण झाल्यास नरिमन वरळीहून थेट पालघरपर्यंत विना अडथळा समुद्रमार्गे प्रवास करता येणार आहे.
- यापूर्वी वांद्रे ते वरळी दरम्यान ५.६ किलीमीटर लांबी चा एक सी-लिंक २०१० मध्ये तयार झाला असून, त्यावरून रोज हजारो वाहने ये-जा करतात.
- तर,वांद्रे ते वर्सोवापर्यंतच्या १७ किमीच्या सी-लिंक चे काम प्रगतिपथावर आहे; तसेच वर्सोवा ते विरार मार्गासाठी थेट जपानच्या जायका संस्थेने कर्ज देण्यास मान्यता दिली आहे.
- ही मार्गिका एकूण ४२.७५ किमी आहे. तिचा खर्च ३१,४२६ कोटींवरून थेट ६३४२४ कोटींवर गेला आहे.
- हाच मार्ग आता पुढे पालघरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. सध्या रस्ता मार्गे विरार ते पालघर ५४.६ किमी अंतर आहे.
- हा सागरी सेतू पालघरपर्यंत वाढविण्यास मार्च २०२३ झालेल्या १५४ बैठकीत मान्यता देण्यात आली होती.
- वर्सोवा-विरार सी-लिंक चार ठिकाणी जोडणार
- सध्या प्रगतिपथावर असलेल्या वर्सोवा-विरार मार्गा वर मार्गिकेवर चारकोप; मीरा-भाईंदर; वसई व विरार, अशा चार ठिकाणी हा सी-लिंक जोडला आहे.
- हा सागरी सेतू किनाऱ्यापासून एक किलोमीटरवर असेल. अंधेरी पश्चिम ते विरारला ही मार्गिका संलग्न करेल.
- गोराई, उत्तन, वसई व विरार येथे चार टोल प्लाझा असतील; तसेच या मार्गिकेपासून वसईपर्यंत १८. ४६ किमीचा विशेष रस्ताही प्रस्तावित आहे.
- मढ आयर्लंडसह गोराई बीचला लाभ
- प्रस्तावित वर्साेवा-विरार सी-लिंक हा मढ आयलंड, गोराई बीच, आगाशी रोड येथे कनेक्ट करण्यात येणार असून, मनोरी येथील खाडी पूल याचाच भाग असणार आहे.
- भाईंदर-वसई खाडी पुलासही फायदा
- विस्तारित सागरी सेतूचा ‘एमएमआरडीए’ च्या प्रस्तावित मुंबई शहर आणि वसई-विरार प्रदेशाच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या खाडी पुलासही मोठा फायदा होणार आहे.
- या पुलावर ‘एमएमआरडीए’ने १००८१ कोटी ६० लाख रुपये खर्च प्रस्तावित केला आहे.
- याळे दोन्ही शहरांतील अंतर तब्बल ३० किमीने कमी होऊन आठ लाख रहिवाशांसह मुंबई-गुजरात प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालकांना त्याचा फायदा होणार आहे.
- खाडीवरील हा पूल पाच किमी लांबीचा राहणार असून तो ३०.६ मीटर रुंद असा सहापदरी राहणार आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space