
राजापूर आगारात उपहारगृह बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- राजापूर आगारा तील एसटीचे उपहारगृह मागील अनेक महिन्यांपासून बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
- कोकणातील सर्वात मोठा गणेशोत्सव सण तोंडावर आ ल्याने मुंबईकर चाकरमानी बहुसंख्येने एसटीने तालुक्यात दाखल होणार असून किमान त्यापूर्वी तरी हे उपहारगृह सु रू करावे अशी मागणी काॅंग्रेस शहराध्यक्ष अजीम जैताप कर यांनी केली आहे.

- राजापूर एस.टी आगारामध्ये असलेल्या उपहारगृहामुळे प्र वाशांची चांगली सोय होत होती. मात्र मागील काही महि न्यांपासून ते बंद करण्यात आले आहे.
- त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. शासनाकडून एसटी प्रवाशांकरिता देण्यात आलेल्या विविध सवलती मुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे.
- मात्र राजापूर आगारात उपहारगृह नसल्याने प्रवाशांना च हा, नाश्ता,जेवण यासाठी आगारा बाहेर शोधाशोध करावी लागत आहे.
- बाहेरुन येणाऱ्या गाड्या राजापूर आगारात अल्प कालाव धीसाठी थांबत असल्याने एसटी उपहारगृहातून प्रवाशांना खाद्य पदार्थ घेणे सोयीचे ठरते होते.
- अशातच आता आगामी महिन्यात गणेशोत्सव असल्याने या उत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी तालुक्यात दाखल होणार आहेत.
- अशा स्थितीत उपहारगृह बंद असल्याने चाकरमन्यांची मो ठी गैरसोय होण्याची शक्यता आहे त्यामुळे गणेशोत्सवा पूर्वी एसटी उपहारगृह सुरु करावे अशी मागणी जैतापकर यांनी केली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











