पालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई : ग्लोबलसिटीने घेतला मोकळा श्वास….!

  • प्रतिनिधी : नितीन राणे :- वसई-विरार महापालिका प्र भाग समिती अ-अंतर्गत ग्लोबलसिटी येथील फेरीवाल्यांवि रोधात अतिक्रमण विभागाने आज (7 ऑक्टोबर) जोरदार कारवाई केली.
  • पालिकेच्या या कारवाईमुळे ग्लोबलसिटीतील रस्ते आणि फूटपाथ मोकळे झाले असून परिसरातील रहिवाशांनी प्रथमच मोकळा श्वास घेतला आहे.
  • 2024 च्या राजकीय सत्तापरिवर्तनानंतर शहरवासीयांना प्रथमच आशेचा किरण दिसला आहे.
  • पण विद्यमान लोकप्रतिनिधी शहरवासीयांच्या अपेक्षेला खरे उतरतात; की तत्कालिन सत्ताधाऱ्यांसारखेच अपेक्षा भंग करतात, हे येणाऱ्या काळात समोर येईलच.
  • तूर्त; पालिकेच्या या कारवाईचे जोरदार स्वागत होत असून फेरीवाल्यांना कायमचा प्रतिबंध करावा, अशी अपेक्षा परि सरातील रहिवाशांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे.
  • वसई-विरार महापालिका स्थापनेनंतर शहरातील सर्वात सुंदर गृहसंकुल म्हणून ग्लोबलसिटी अस्तित्वात आली होती.
  • मुंबई आणि परिसरातील नामांकित व प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकांनी मिळून शेकडो इमारती या परिसरात बांधल्या होत्या.
  • सर्वसुविधांनी अद्ययावत गृहसंकुल अशी प्रसिद्धी मिळा ल्याने मुंबई, ठाणे आणि अन्य परिसरातील ग्राहकांनी ग्लो बलसिटीला पसंती दिली होती.
  • मोठ्या अपेक्षेने लाखो रुपयांचे फ्लॅट ग्राहकांनी खरेदी केले होते. अंदाजित 25 हजारहून अधिक लोकसंख्या या परिसरात वास्तव्य करून आहे.
  • परंतु; तत्कालिन निष्क्रिय सत्ताधाऱ्यांच्या व्यावसायिक वृ त्तीने या सर्वांच्याच अपेक्षांवर अल्पावधीतच पाणी फेरले.
  • तब्बल 15 वर्षांहून अधिक काळ या रहिवाशांना पाण्यासा ठी तत्कालिन सत्ताधारी व पालिकेसोबत झुंजावे लागले.
  • त्यात भरीस भर म्हणून या गृहसंकुलांतील विस्तृत मोक ळ्या रस्त्यांवर सत्ताधारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आ ठवडी बाजार सुरू केले.
  • मोठमोठाल्या दुकानांसमोर जबरदस्ती फेरीवाले आणि अ न्य स्टॉल्स उभारून आपली दुकानदारी चालवली. साहजि कच; लाखो रुपयांची घरे घेऊन बसलेल्या रहिवाशांच्या पदरात निराशा व हतबलता आली.
  • दुकानदारही नाराज होते. अनेकदा याविरोधात कारवाई ची मागणी झाली; परंतु त्यांच्या या मागणीला कोणीच दाद देत नव्हते.
  • तत्कालिन सत्ताधारीही रोजच्या लाखो रुपयांच्या वसुलीवर पाणी सोडायला तयार नव्हते. आजपर्यंत ही परिस्थिती कायम होती.
  • त्यामुळे हजारो ग्लोबलसिटी वासीय तोंड दाबून बुक्क्यां चा मार सहन करत होते.
  • आजअखेर या परिसरातील अतिक्रमण आणि फेरीवाल्यां विरोधात वसई-विरार महापालिकेने अनपेक्षित कारवाई केल्याने ग्लोबलसिटीवासीय सुखावले आहेत.
  • समाजमाध्यमांवर या संदर्भात उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून, अनेकांनी वसई-विरार महापालिका आणि वि द्यमान लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.
  • ही मोहीम कायम राहावी; या परिसरातील आठवडे बाजार कायमचे बंद करण्यात यावेत.
  • तसेच फूटपाथ आणि रस्ते कायमस्वरूपी मोकळे राहण्या साठी फेरीवाल्यांना कायमाचा प्रतिबंध करण्यात यावा, अशी उत्स्फूर्त मागणी केली आहे.
  • दरम्यान;वसई-विरार महापालिका अतिक्रमण विभागाच्या ग्लोबलसिटीतील जोरदार मोहिमेनंतर विरार पश्चिम परिस रातील नागरिकांनी विरार पश्चिम येथील मलांज मैदानाती ल आठवडी बाजार, तिरुपती नगर, विरार पूर्व-पश्चिम उड्डा णपुलावर भर रस्त्यात भरणारा मासळी बाजार आणि नक्षत्र गार्डनजवळील खाऊगल्ली हटविण्याची एकमुखी मागणी केली आहे.
  • विरार पश्चिम-जकात नाकाशेजारील मलांज मैदानात दर रोज मोठा बाजार भरत असल्याने या बाजारात येणारे ना गरिक दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी करत असतात.
  • त्यामुळेे या परिसरात रहदारीला अडथळा येतो. या ठिका णी दुभाजक बसवावेत, अशी मागणीही अनेकदा झालेली आहे.
  • रस्त्यात उभ्या करून ठेवण्यात येणाऱ्या वाहनांमुळे अप घातांची शक्यता वाढते. त्यामुळे हा बाजार बंद करावा, अ शी मागणी सातत्याने होत आलेली आहे.
  • विशेष म्हणजे; तिरुपती नगर, विरार पूर्व-पश्चिम उड्डाण पुलावर भर रस्त्यात भरणारा मासळी बाजार आणि नक्षत्र गार्डनजवळील खाऊगल्लीमुळेही शहरवासीयांना प्रचंड प्र माणातील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
  • त्यामुळे या अतिक्रमणांवरही कायमस्वरूपी तोडगा काढा वा, अशी मागणी या कारवाईनिमित्ताने पुन्हा एकदा पुढे आली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles