स्वराज्य मित्र मंडळ भगतेवाडी (इंदवटी-लांजा) आयोजित लांजा राजापूर मर्यादित भव्य मॅरेथॉन स्पर्धा २०२४ (पर्व २ रे ) यशस्वीरीत्या संपन्न.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : लांजा : प्रमोद तरळ :- स्वराज्य मित्र मंडळ भग ते वाडी (इंदवटी-लांजा) रत्नागिरी भव्य मॅरेथॉन स्पर्धा २०२४ दिनांक १२/५/२०२४ रोजी निओशो ते इंदवटी दरम्यान लांजा राजापूर तालुक्यातील गाव अंतर्गत मर्यादित भव्य मॅरेथॉन स्पर्धा २०२४आयोजित करण्यात आले होते.
- ६५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता पैकी ५६ स्पर्धकांनी सहभाग दाखवला.
- मॅरेथॉन स्पर्धा २०२४ विजेते :
- ‘अ’ गट मुले विजेता (वय १३ ते १५ वर्षे)
- १) तन्मय गावडे गाव माजल लांजा (प्रथम क्रमांक) २) अथर्व माजळकर गाव झापडे लांजा (दुतीय क्रमांक)
- ३) मनीष पालये गाव कोड्ये लांजा (तुत्तीय क्रमांक) ‘अ’ गट मुली विजेत्या (वय १३ ते१५ वर्ष), १) सौरभी गुरव गाव वनगुले लांजा (प्रथम क्रमांक) २) स्वरा उपशेटे लांजा (दुतिय क्रमांक)
- ‘ब’ गट मुले विजेता (वय १६ ते १९ वर्ष)
- १) महेंद्र कुडकर गाव शिरवली लांजा (प्रथम क्रमांक),
- २) शुभम मांडवकर गाव पेंडखले राजापूर (दुतीय क्रमांक) ३) सोहम कांबळे गाव चूनाकोळवन राजापूर (तुतीय क्रमांक),
- ‘ब’ गट मुली विजेत्या (वय १६ ते १९ वर्ष)
- १) श्रुती पळसमकरगाव भू राजापूर (प्रथम क्रमांक)
- ‘क’ गट मुले विजेता ( वय २० ते ५० वर्ष)
- १) निलेश कुळये गाव वेरवली लांजा (प्रथम क्रमांक),
- २) संकेत मसने गाव पन्हळे लांजा (दुतीय क्रमांक),
- ३) संकेत पाजवे गाव दसुर लांजा (तुतीय क्रमांक),
- ‘क’ गट मुली विजेत्या ( वय २० ते ५० वर्ष)
- १) समिका मणचेकर गाव देवधे लांजा (प्रथम क्रमांक)
- २) संजना घडशी गाव इंदवटी लांजा (दुतीय क्रमांक),
- या स्पर्धेसाठी लाभलेलं उत्तम पचं श्री मा. श्रीधरजी पाटील आणि श्री मा. निलेशजी बागडी तसेच मान्यवर सरपंच गुरव, नामदेव कानडे,अनोज जाधव,शैलेश जाधव, तांबे,जाधव आ रोग्य सेविका मॅडम सर्वांचे मनःपुर्वक आभार मानण्यात आले.
- आर्थिक मदत, चषक साहित्य, टी -शर्ट तसेच जाहिरात स्वरू पात स्पर्धा यशस्वीतेसाठी अनेकांनी सहकार्य केले त्यांचे यावेळी मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
- तसेच श्री मा.शांताराम कानडे श्री मा. उमाकांत पालकर आणि श्री मा. संजय सिताराम भगते यांचेही आभार मानण्यात आले.
- नेतृत्व गुण अनेकांमध्ये असतात फक्त ते हेरून त्यासाठी संधी मिळणे आणि मिळालेल्या संधीतून अस्तित्व निर्माण करणे हे प्रत्येकाला जमलं पाहिजे. सर्वाना ज्ञात आहे.
- “स्वराज्य मित्र मंडळ संघटना असून ही एक मार्गदर्शक चळ वळही आहे. आपल्या माणसांनी एकत्र येत आपल्याला साठी बनविलेले संघटन आहे.
- अशा उपक्रमाच्या आयोजनांतून अनेकांना त्यांच्या कलागुणां ना वाव मिळून विविध संधी तयार होत असतात. मात्र संधी म्हणजे मॅरेथॉन खेळ नसून त्याअनुषंगाने उत्तम वक्ता (समा लोचक), गुणलेखक, पंच समीक्षक बनू शकतो.
- हे ही काल पाहायाला मिळाले. या स्पर्धांबरोबरच शैक्षणिक शिबीर, आरोग्य शिबीर, सांस्कृतिक कलाविष्कार, रक्तदान, सहल असे विविध उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविले जात आहेत.
- त्याचे फायदेही समाजातील तरुणांना होत आहेत. आपली संस्था, आपला परिवार! मानत आपण एकमेकांच्या सुखदुः खाचा भाग आहोत.
- तेव्हा सामाजिक कार्यात खारीचा वाटा असायला हवा. समा जऋण जपण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने या संस्थेला नवीन उपक्रम राबवताना समाजातून समाजाला व तरुण पि ढीला काहीं देण्यासाठी आपच्या सहकार्याची अपेक्षा असल्या चे मत स्वराज्य मित्र मंडळ भगते वाडी (गाव इंदवटी-लांजा) रत्नागिरी यांच्या वतीने व्यक्त केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space