राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र…! दहा हजारांवर गावे, वाड्यांत दुर्भिक्ष; सरकारची डोळेझाक.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : कल्पेश राणे :- मुंबई – राज्याला पाणीपुवरठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ २४ टक्के पाणीसाठा शिल्लक असून १० हजारांहून अधिक वाड्या, गावांना टँकरवर अवलं बून राहावे लागत आहे.
- नागरिकांसह पशुधन पाण्याअभावी संकटात आले असून, लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या दुष्काळाकडे मात्र डोळेझाक करण्यात आली.
- सध्या मॉन्सूनपूर्व पाऊस सुरू असला तरी हा पाऊस मुरवणी चा नसल्याने पाणीसाठ्यात फारसा फरक पडत नाही. शिवा य या पावसामुळे चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
- मात्र वास्तवात तसा फारसा फरक पडेल असे शेतकऱ्यांना वाटत नाही. सध्या २९३४ गावे आणि ६५३९ वाड्यांवर ३६२२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जास्त असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
- यात केवळ ९३ टँकर सरकारी तर ३५२९ खासगी टँकर्स आहेत. ज्या गावांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे तो केवळ पिण्यासाठी असून, जनावरांच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष आहे.
- परिणामी पशुधन संकटात आले आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक विभागात पाण्याचे संकट अधिक गंभीर होत असून पावसाकडे सर्वांचे डाळे लागले आहेत.
- छत्रपती संभाजीनगर विभागात तब्बल १२३६ गावे, ४९८ वा ड्या तर नाशिक विभागात ७४६ गावे आणि २५३६ वाड्या तहानल्या आहेत.
- येथे अनुक्रमे १८१२ आणि ८०३ टँकरद्वारे पाणीपुवरठा केला जात आहे. पुणे विभागातील ३७७५ वाड्या, ६२८ गावांना ७४८ टँकरद्वारे पाणीपुवरठा सुरू आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space