वसई विरार शहर महानगपालिका 13 वर्षाच्या स्थापनेनंतरही आपल्या नागरिकांना मूलभूत व पायाभूत सुविधा पुरिण्यास सपशेल फेल ठरली आहे.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- रिपोर्टर: नितीन राने :-लोकशाहीचे विकेंद्रीकरण होऊन त्यात लोकसहभाग वाढावा ह्या दृष्टिकोनातून 73 वी व 74 वी घटनदुरुस्ती करून त्यात पंचायत राजचे ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्थापनेचे कलम संविधानात समाविष्ट करण्यात आले.
- त्यानुसार एखाद्या ठिकाणी क्षेत्रफळाच्या व लोकसंख्येनुसार ग्रामपचायत ते पंचायत समिती ते नगरपरिषद ते नगरपालिका ते महानगरपालिका अशा टप्प्या टप्प्याने उत्क्रांत व विकसित होऊन महानगरपालिका अस्तित्वात येतात.
- ह्यात मूलतः वाढणाऱ्या क्षेत्रफळानुसार व लोकसख्येनुसार पायाभूत सुविधा निर्माण करणे व वाढणाऱ्या लोकसंख्येला मुबलक पिण्याचे पाणी, सुस्थितीत रस्ते,मोफत किंवा माफक दरात शासकीय दवाखाने किंवा औषधोपचार, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, दळणवळण व्यवस्था, बाजारपेठ उपलब्ध करून देणे व म.न.पा च्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन सुसह्य करून जीवनमान उंचावणे.
- पण 3 जुलै 2009 ला स्थापन झालेली वसई विरार शहर महानगपालिका 13 वर्षाच्या स्थापनेनंतरही आपल्या नागरिकांना मूलभूत व पायाभूत सुविधा पुरिण्यास सपशेल फेल ठरली आहे.
- मनपाच्या हद्दीतील रस्ते हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे नेहमीच रस्त्यावर खड्डे की खड्यात रस्ते हेच कळायला मार्ग नाही. ?
- थोडा जरी पाऊस पडला तरी नाले तुडुंब भरून 4 दिवस घराबाहेर पडता येत नाही, दिवसातून अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होणे हे इथल्या नागरिकांच्या पाचवीला पुजलेलेच.
- आता जानेवारीपासून मनपाने अनियमित व कमी दाबाने पाणी पुरवठा करावयास सुरुवात केली आहे व आजही नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत.
- मनपाचे रस्ते हे रहदारीसाठी ,वाहतुकीसाठी व दळवळणासाठी आहेत की रहदारीच्या रस्त्यावर भाजी,फळे,फुले, कपडे ह्यांचे दुकाने व बस्तान मांडून पादचाऱ्यांना व वाहनचालकांना त्रास देण्यासाठी आहे हेच कळत नाही.
- भरीस भर म्हणून मनपा ज्या ठेकेदारांना मनपाच्या हद्दीतील फेरीवाले,रस्त्यावर व्यवसाय ,विक्री,धंदा करणारे ह्यांच्याकडून अधिकृत की अनधिकृत न बघता सऱ्हास सगळ्यांकडून प्रतिदिन 30 रुपये वसूल करतात.
- मजेची बाबा हि की मनपा क्षेत्रात अनेक हातगाड्या,स्टॉल्स हे अनधिकृत आहेत व ह्यांना मनपाच्या अधिकाऱ्यांचा व स्थानिक राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या वरदहस्त आहे .
- काही राजकीय पक्षांनी तर स्वतःच्या नावाने ह्या अनधिकृत विक्रेत्यांना ओळखपत्रे ही बहाल केलेली आहे.
- इथे जागेची व हातगाडीची विक्री ही त्या त्या स्थानिक नेत्याच्या मर्जीवर,त्याला दररोज किंवा महिना किती रुपये द्यायचे ह्यावर ठरलेले असते.
- सर्वसामान्य नागरिक इथे कोणत्याही प्रकारचा स्थानिक राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याशिवाय इथे व्यवसाय करू शकत नाही,आणि मजेशीर बाब ही की इथे परराज्यातून आलेले लोक जास्त प्रमाणात अनधिकृत व्यवसाय करतात.
- ह्या दररोजचा कंत्राटदाराला देयकाच्या पावतीवरून मनपा त्यांना विविध योजनाअंतर्गत सबसिडी,कमी व्याजाने आर्थिक सहाय्य, लोन अशा सुविधा राबवत असते.
- मग मनपाचे अतिक्रमण विभाग का ठेवला आहे व त्यामध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार सर्वसामान्य कर दात्यांच्या पैशातून का दिले जात आहे असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space