वो मोहब्बत बाटता है तुम नफरत बाटो….!
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतिनिधी : यवतमाळ : इरफान शेखजी शेख :- लोकसभे चे विरोधी पक्षनेते, जननायक श्री राहुलजी गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणे हा अत्यंत गंभीर आणि निंदनीय प्रकार आहे.
- अशा धमक्यांमुळे फक्त एखाद्या व्यक्तीचेच नव्हे तर देशाच्या लोकशाही व्यवस्थेचेही नुकसान होते. राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे नेते असून ते भारतीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
- त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देणे हे लोकशाहीचे उल्लंघन आहे. अशा धमक्यांमुळे श्री राहुलजी गांधी यांना काहीच फर क पडणार नाही पण सरकार ने प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे.
- या प्रकरणात सरकार आणि कायदा यंत्रणांनी तातडीने आ णि कडक पावले उचलून संबंधित गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
- जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्यांना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात असे कृत्य करणाऱ्यांना धडा मिळेल.
- लोकशाहीत राजकीय नेत्यांमध्ये मतभेद असणे स्वाभाविक आहे, परंतु विचारधारांचा संघर्ष हिंसेकडे वळणे अत्यंत चुकीचे आहे.
- मतभेदांच्या दरम्यान संवाद, चर्चा आणि समन्वय महत्त्वाचे अ सतात, परंतु जीवे मारण्यासारख्या धमक्या समाजातील सहि ष्णुता आणि शांततेसाठी घातक आहेत.
- कायदा-सुव्यवस्था राखणे, सर्व नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही सरकारची जबाबदारी आहे. श्री राहुलजी गांधी यांना आलेली धमक्यांमुळे त्यांच्या सुरक्षेचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे.
- यासोबतच, देशातील राजकीय नेत्यांनीही एकत्र येऊन अशा प्रकारांच्या विरोधात कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे.
- मा.आ.विजयराव खडसे उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघ ; प्रज्ञानंद विजयराव खडसे मा.सभापती पंचायत समिती उमरखेड.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space