आदर्श गाव विरसई येथे बांबू लागवड.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : विरसई : नितीन राणे :- दापोली तालुक्यातील आदर्श गाव विरसई येथे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने माझी व सुंधरा अभियान ५.०अंतर्गत बांबू लागवड व बांबू लागवडी बाबत विविध योजनांची माहिती देण्यात आली.
- सदरची बांबू लागवड गावचे सार्वजनिक ठिकाण देवराईच्या परिसरात करण्यात आली. शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बांबू लागवड बाबत ग्रामसेवक विरेश कदम यांनी माहिती दिली.
- तसेच शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा अभियान ५.० ची विरसई येथे चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होत आहे.
- यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ व शेतकरी हे माझी वसुंधरा अभियान राबविण्यासाठी एकवटलेले आहेत.
- या अभियानांतर्गत गावामध्ये विविध उपक्रम शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ, शेतकरी यांच्यामार्फत यशस्वीरित्या संपन्न होत आहेत.
- या बांबू लागवड कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य ग्रामरोजगार सेवक समीर गोरीवले, संगणक परिचालक दिव्या काशीकर, विस्तार अधिकारी दिनेश राणे यांचे मार्गदर्शन लाभले.
- बांबू लागवड कार्यक्रमाप्रसंगी सरपंच मनोरमा राणे, मुंबई मं डळाचे सचिव सुरेश बेटकर, ग्रामीण कमिटीचे अध्यक्ष कृष्णा राणे,ग्रामसेवक विरेश कदम, सहसचिव संदीप राणे, सुनील राणे, मंगेश राणे, गणपत भुवड,चेतन राणे, राजेंद्र मोहिते, सेजल कलवणकर, विजय कलवणकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space