सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बुडवला ८४ कोटी ७८ लाखांचा कर; गुन्हा दाखल
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा २००२ अंतर्गत सर्व गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. याप्रकरणी राज्य कर निरीक्षक विनीत सर्जेराव पाटील (वय ३७, रा. चिंतामणीनगर, सांगली) व दरिबा शंकर गलांडे (रा. गावभाग सांगली) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांही थकबाकीदारांनी वारंवार पाठपुरावा करूनही थकबाकी भरली नाही.
- फेब्रुवारी २०१२ मध्ये त्यांना पोलिस अभियोग प्रस्तावाबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.
- त्यालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र शासनाने अभय योजना २०२२ जाहीर केली.
- या योजनेचा फायदा घेण्याच्या सूचना केल्यानंतरही त्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केले. अखेर विक्रीकर विभागाच्या राज्यकर सहआयुक्त (कोल्हापूर) सुनीता थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार मंगळवारी उपायुक्त सुनील कानगुडे व संजय माने (सांगली) यांनी गुन्हा दाखल केला.
- देशमाने (रा. पुणे बंगळूर रोड, पेठ, ता. वाळवा) यांचा खाद्यतेल विक्रीचा व्यवसाय आहे. देशमाने यांच्यावर ३६.७२ कोटी, १.४२ कोटी, सौ. देशमाने यांच्यावर २९.७३ कोटी, तर महेशकुमार जाधव (रा. पाण्याची टाकीजवळ, पेठ) यांच्यावर १६.९० कोटी कर थकवल्याचा आरोप आहे. २०१२ पासूनची ही प्रकरणे आहेत.
- …तर कारवाई अटळ
- महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाअंतर्गत प्रलंबित थकबाकी वसुलीची मोहीम सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील मोठ्या थकबाकीदारांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.
- कोल्हापूर विभागातील सर्व मोठ्या व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील थकबाकीचा भरणा तातडीने करावा अन्यथा कारवाई अटळ असल्याचा इशारा कोल्हापूर विभागाचे राज्य कर सह-आयुक्त सुनीता थोरात यांनी दिला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space