
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाच्या निषेधार्थ आजपासून निघणार “तिरडी यात्रा”.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- मुंबई–गोवा महामा र्गा- बाबत गेले १७ वर्षे सतत नवीन डेडलाईन दिल्या जात आहेत.
- कोकणकरांनी त्या प्रत्येक वेळा सहनही केल्या परंतु आ ता कोकण करांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून महा मार्गाच्या रखडलेल्या कामाचा तिरडी घेऊन निषेध नोंदव ला जाणार आहे.

- सदर तिरडी यात्रेला दि. ०६ डिसेंबर २०२५ पासून सुरुवा त होणार असून कोलेटी – नागोठणे – कोलाड – इंदापूर – माणगाव –लोणेरे –खेड –चिपळूण –पाली – हातखां बा –निवळी –संगमेश्वर –लांजा येथे समाप्त होईल.
- तिरडी यात्रेचे टप्पे ०६ व ०७ डिसेंबर २०२५ (शनिवार-रविवार)कोलेटी-रायगड १३ व १४ डिसेंबर २०२५ (शनि वार-रविवार)
- २० व २१ डिसेंबर २०२५ (शनिवार-रविवार),
- २७ व २८ डिसेंबर २०२५ (शनिवार-रविवार),
- ०१ जानेवारी २०२६ (गुरुवार-NHAI कार्यालय),
- ०३ व ०४ जानेवारी २०२६ (शनिवार – रविवार),
- १० व ११ जानेवारी २०२६ (शनिवार-रविवार)
- ११ जानेवारी २०२६ रोजी संगमेश्वर येथे रास्तारोको करण्यात येणार आहे.
- कोकणकरांना आणि स्थानिकांना आवाहन आवाहन कर ण्यात येते की आपण सर्वजण नोकरी- धंद्यामुळे शहरात असते.
- पण आपल्या हक्कासाठी, आपल्या कोकणासाठी, आप ल्या सुरक्षेसाठी – एक रविवार द्यावा.
- महामार्गाच्या नावाखाली झालेल्या या विनाशाचा हिशोब घेण्यासाठी “तिरडी उचलू, न्याय मिळवू”, कोकणचा आवा ज जगाला ऐकू जाऊ द्या एवढ्या मोठ्या संख्येने या तिर डी यात्रेत सामील व्हावे.
- असे आवाहन कोकणकर, मुंबई–गोवा महामार्ग जनआ क्रोश समिती व कोकणातील विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहे.
- अधिक माहितीसाठी सुरेंद्र पवार – 8169962815, प्रशि ल लाड – 9321956677,संजय जंगम – 93219566 77, जितेंद्र गिजे – 9323482956 आदी भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











