
राज्यात मोठी खळबळ..! 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना अटक.
- प्रतिनिधी : संदीप कारके :- राजकारणात, सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकली माणूस हरला जालना जिल्ह्या त 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याने खळबळ उडाली आहे.
- आर्थिक गुन्हे शाखेने 31 आरोपींना अटक केली असून त्यात 22 तलाठी, 5 तहसील कर्मचारी, जिल्हाधिकारी का र्यालयातील एक कर्मचारी आणि संगणक तज्ज्ञांचा समावे श आहे.

- अंबड आणि घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नावावरचे अनुदान बनावट लाभा र्थ्यांच्या खात्यावर वळवण्यात आले.
- एक गुंठाही जमीन नसलेल्या व्यक्तींची नावे लाभार्थी यादीत टाकून 24 कोटी 90 लाखांहून अधिक रकमेचा अपहार करण्यात आला.
- तहसीलदारांचे लॉगिन व पासवर्ड वापरून प्रणालीत फेर फार केल्याचे उघड झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या चौक शीनंतर गुन्हा दाखल झाला.
- न्यायालयाने आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले. आरोपींची बँक खाती सील, मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू आहे. चार आरोपी फरार असून तपास सुरू आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











