
आंगले बौध्दवाडीतील धोकादायक वीज खांब बदलले सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांच्या प्रयत्नाना यश.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील आंग ले गावातील बौद्ध वाडी येथील धोकादायक स्थितीत अस लेले लाईटचे जुनं गंजलेले पोल आंगले गावातील सामाजि क कार्यकर्ते विलास राऊत यांच्या प्रयत्नाने बदलण्यात आले आहेत.
- या कामी बौद्ध वाडीतील ग्रामस्थ व तसेच आयु.अरुण ना रायण तांबे यांनी विशेष सहकार्य केले तसेच राजापूर महा वितरणचे कर्मचारी वायरमन आयु. महेश तांबे यांनी सुद्धा या कामाकरिता मोलाचे सहकार्य केले असे सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांनी सांगितले.

- पावसाला सुरू होण्यापूर्वी धोकादायक पोल बदलणे गर जेचे होते गावातील सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांनी सातत्याने पुढाकार घेऊन महावितरणकडे पाठपुरा वा केला आणि जीर्ण गंजलेले पोल बदलून घेतले असे बौध्द वाडीतील ग्रामस्थ आयु.अरुण नारायण तांबे यांनी पत्रकार प्रमोद तरळ यांच्याशी बोलताना सांगितले.
- गावच्या विकासासाठी सातत्याने अग्रेसर असणारे सामा जिक कार्यकर्ते विलास राऊत यांचे बौध्द वाडीतील ग्राम स्थांच्या वतीने जाहीर आभार मानण्यात आले आहेत व त्यांच्या सामाजिक कार्याला खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











