पोषण आहाराचा छुपा खजिना भारताकडे
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- रिपोर्टर : ईरफान शेख :- नागपूर : मनुष्याला जडणाऱ्या ८० टक्के आजारांचे मूळ हे आहारात दडल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
- मात्र, मानवी शरिराला पोषक ठरणाऱ्या पोषण आहाराची क्षमता भरडधान्यात आहे, हे देखील जगाने मान्य केले असून जगाला जे भरडधान्य पुरविले जाते, त्यात भारताचा वाटा २० टक्के आहे.
- जगाला पोषण आहार पुरविणाऱ्या भारताकडे छुपा खजिना दडला आहे, असा सूर श्री अन्न अधिवेशनात उमटला.
- विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या रसायनशास्त्र इंजीनिअरिंग विभाग आणि राष्ट्रीय महिला, बाल आणि युवा विकास विभागाच्या वतीने व्हीएनआयटीच्या प्रांगणात आयोजित श्री अन्न अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
-
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नक्ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे तर प्रमुख अतिथी म्हणून हैदराबाद येथील भरडधान्य विकास संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र चापके, व्हीएनआयटीच्या केमिकल इंजीनिअरिंग विभाग अध्यक्ष डॉ. सचिन मांडवगणे, युसीडचे राजेश मालविय, कापूस संशोधन परिषदेचे संचालक डॉ. ए. एल. वाघमारे, कृषी अनुसंधान परिषदेचे डॉ. डी. बी. ठाकरे, सातारा येथील विजय मुळे उपस्थित होते.
- केंद्र सरकारकडून सप्तसूत्री कार्यक्रम
- भरडधान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी केंद्र सरकारने सप्तसूत्री मिशन हाती घेतल्याचे सांगत मालविय म्हणाले, भरडधान्याच्या देशी वाणांचे संशोधन, लूप्त होणारे भरडधान्य संवर्धन, बीज बँक, वितरण साखळी, मार्केटिंग, दलाल साखळी खंडीत करणे, स्टार्टअपला प्रोत्साहन हा सप्तसूत्री मिशनचा धागा आहे. या माध्यमातून देशभर भरडधान्य बीज बँक साखळी तयार केली जात आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space