भीक मागण्यासाठी अपहरण केलेल्या दोन अल्पवयीन मुलांची पोलिसांनी सहीसलामत केली सुटका.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : माधवी चंदरकी :- येथील झोपडपट्टी तून भीक मागण्यासाठी अपहरण केलेल्या दोन अल्पवयीन मुलांची पोलिसांनी दहा दिवसांनी हैद राबाद येथून सहीसलामत सुटका केली.
- हैदराबाद येथे रेल्वेस्थानकावर भीक मागताना त्या मुलांना आई-बाबांची आठवण आली, त्यांनी एका प्रवाशाकडील मोबाईलवरून घरी फोन केला,
- त्यानंतर मुलांचे लोकेशन निश्चित झाले व तातडीने पोलिसांनी घटनास्थ ळी जाऊन मुलांना ताब्यात घेतले.
- या मुलांचे अपहरण केलेल्या काजल सुधाकर सूर्यवंशी (वय ३५, रा. कनान नगर, कोल्हापूर) या महिलेला पोलिसांनी अटक केली.
- पोलिस निरीक्षक अजय सिंदकर आणि अपहरण झालेल्या मुलांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहिती नुसार, झोपडपट्टीतून अपहरण झालेल्यां मध्ये एका अकरा वर्षांच्या मुलीचा आणि बारा वर्षांच्या मुलाचा समावेश होता.
- दोघांचे अपहरण एका भीक मागणाऱ्या महिलेने केल्याचा संशय कुटुंबीयांनी २७ ऑगस्टला पोलिसांत दिलेल्या फिर्यादीतून व्यक्त केला होता. तसेच संबंधित महिलेचे छायाचित्रही पोलिसांना दिले होते.
- अपहरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी मिरज, गोव्यासह कोल्हापुरात त्यांचा शोध सुरू ठेवला होता.
- दरम्यान, आईची आठवण येत असल्यामुळे अपह रण झालेल्या मुलाने हैदराबाद येथे रेल्वे स्थानका वर एका प्रवाशास विनंती करून त्याच्या मोबाईल वरून घरी फोन केला.
- मात्र, अनोळखी नंबर असल्यामुळे तो उचलला नाही. पुन्हा त्या नंबरवर फोन केल्यानंतर लहान मुलाने हैदराबादहून फोन केल्याचे त्या प्रवाशाने सांगितले.
- यावर कुटुंबीयांनी तातडीने याची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या क्रमांकावर मुलाचे छायाचित्र व्हॉटस् ॲपद्वारे पाठविले.
- तेव्हा त्या प्रवासी व्यक्तीने हाच मुलगा होता असे सांगितले. यानंतर हैदराबाद रेल्वेस्थानकाच्या पोलिसांना याची माहिती दिली.
- त्यांनी रेल्वेस्थानकावर शोध घेतला. त्यावेळी तेथील एका सिग्नलवर ही मुले भीक मागत असल्याची आढळली.
- पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कोल्हापुरातील पोलिसांशी आणि मुलांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. पोलिसांनी मुलाच्या नातेवाईकांना तातडीने हैदराबादला बोलविले.
- दरम्यानच्या काळात शाहूपुरी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण, कॉन्स्टेबल लखन पाटील, विशाखा पाटील हे हैदराबाद येथे चौकशी साठी पोहोचले.
- त्यांनी दोन्ही अल्पवयीन मुलांसह अपहरण करणा ऱ्या महिलेलाही कोल्हापुरात आणले. महिलेला अटक केली असून, दोन्ही अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात ठेवले असून कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
- दादा मला न्यायला ये… परत कोठे जाणार नाही…
- अल्पवयीन मुलीने हैदराबादमधून पोलिसांच्या फोनवरून बोलताना ‘दादा मला न्यायला ये…’ असे सांगितले.
- दरम्यान तिला सुखरुप येथील सुधारगृहात आण ल्यावर भाऊ तिला प्रत्यक्षात भेटला तेव्हा तिने जवळ येऊन ‘परत कोठेही जाणार नाही…’ असे सांगितले. यावेळी तिचा कंठ दाटून आला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space