सांगोला तालुक्यातील विधानसभेच्या निवडणुकीबाबत अनेक कमेंट,व्हिडिओ व्हायरल; कार्यक्रम तर करेक्ट होणार..! मात्र कोणाचा…? याबाबत चर्चाना उदान.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : धनंजय गोफने :- आगामी निवडणु कीचे वारे सोशल मीडियावर जोरात वाहू लागली आहे. ठीक ठिकाणच्या बैठकातून निवडणुकांच्या चर्चेबरोबरच फेसबुक, व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियावरही प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
- सांगोला तालुक्यातील सध्या विधानसभेच्या निवड णुकीबाबतही अनेक कमेंट, व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्येच ‘कार्यक्रम तर करेक्ट होणार!’ मात्र कोणाचा ? याबाबत चर्चाना उदान येत आहे.
- सांगोला तालुका हा राजकीय दृष्ट्या तसा कित्येक वर्षापासून शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळख ला जात होता.
- मात्र 2019 च्या निवडणुकीची वेळी अल्पमतात का होईना शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील विज य तर झालेच परंतु गुवाहाटीमधील त्यांच्या ‘काय झाडी, काय डोंगार..’ या वाक्यामुळे सर्वत्र प्रसिद्धही झाले.
- सध्या तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात आणला गेलेला निधी, या निधीतून सुरू असणारे विविध कामे, टेंभू, म्हैसाळ, उजनी व निरा उजवा कालव्या तून मिळालेले पाणी यावर राजकीय भांडवल मोठ्या प्रमाणात केले जात आहे.
- सांगोला तालुका म्हणलं की सर्व निवडणुका ह्या पाण्याभोवतीच फिरत होत्या. आजही पाण्याच्या बाबतीतही अशीच परिस्थिती कायम असल्याचे सोशल मीडियाच्या प्रतिक्रियावरून दिसून येत आहे.
- तालुक्यात येणारे निधी असो, पाणी असो किंवा इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर सोशल मीडियाद्वारे विवि ध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, नेतेमंडळी चर्चा करीत असतात.
- गेल्या पन्नास वर्षाचा व सध्या पाच वर्षाचे तुलना या प्रतिक्रियातून दिसून येते. यामध्ये अनेक बाबतीत सकारात्मकतेच्या व नकारात्मकतेच्या दृष्टीनेही चर्चा होते.
- राजकीय कार्यकर्ते आपापल्या परीने दोन्ही बाबतीत ही चर्चा करताना ‘कार्यक्रम तर करेक्ट होणार !’ अशीच भाषा बोलत आहे.
- परंतु कार्यक्रम नक्की कोणाचा होणार याबाबत स्पष्टपणे बोलत नसल्याने नक्की कार्यक्रम कोणाचा होणार याबाबत चर्चेला उदान येत आहे.
- दीपक आबाही ठोकणार शड्डू…?
- सांगोला तालुक्याचे राजकारण हे पक्षनिष्ठेपेक्षा सध्या व्यक्तिनिष्ठतेवर जास्त अवलंबून असल्याचे चित्र दिसून येत आहे.
- 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी व त्यानंतर आमदार शहाजी पाटील यांच्या बरोबरीने प्रत्येक कार्यक्रमात,निवडणुकांत बरोबरीने असणा रे दीपक साळुंखे पाटील हेही विधानसभेच्या दृष्टीने विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
- साळुंखे-पाटील आखाड्यात उतरून शड्डू ठोकत असले तरी विधानसभा निवडणुकीची खरी कुस्ती धरणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
- यावेळी आबा कार्यकर्त्यांना कामाला लागा असा संदेश देताना दिसत असून कार्यकर्तेही सोशल मीडियातून आबांना ‘भावी आमदार’ असे संबोधित आहेत.
- शेकापमधील वाद चव्हाटय़ावर –
- 2019 ची विधानसभा लढवलेले डॉ. अनिकेत देशमुख हे पुढील शिक्षणासाठी मतदारसंघापासून दूर राहिले याच कालावधीत डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी आपले शिक्षण व डॉक्टरकी सोडून पक्षा साठी वेळ दिला.
- गावोगावी जाऊन त्यांनी पक्षातील कार्यक्रमांना व कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन अडचणी जाणून घेऊ लागले.
- डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे पक्षातील स्व. गणपतराव देशमुख यांच्या बरोबरीने काम केलेले अनेकजण काही कारणास्तव नाराजही झाले.
- या नाराजी नाट्यातून त्यांनी वेगळी बैठकही घेतली. सध्या 2024 च्या आगामी विधानसभा निवडणुकीतील दोन नातूमध्ये उमेदवार कोण असा प्रश्न उपस्थित होत असतानाच पक्षामधील नाराजी नाट्यही समोर येऊ लागले आहे.
- परंतु पक्षातील वाढते प्रस्त,त्यांचा वाढता जन संपर्क यामुळे डॉ. बाबासाहेब देशमुख हे विधान सभेची निवडणूक नक्की लढतील हे सध्या तरी दिसून येत आहे.
- नाराजांची नाराजी आमदार बापू दूर करणार का ?
- आमदार शहाजी (बापू) पाटील हे आपल्या कार्य कर्त्यांच्या फळीमुळेच अनेक वर्ष विविध निवडणू का शेकापविरोधात लढत राहिले.
- 2019 ची निवडणूक बापू विजयी झाले, त्यांना मोठी प्रसिद्धीही मिळाली. राजकीय परिस्थितीमुळे बापूंचे स्थानही वाढले.
- अशा राजकीय परिस्थितीत तालुक्याच्या विकास कामांसाठी मोठा निधीही मिळू लागला. गेल्या कित्येक वर्षापासून बापूंजवळ राहिलेले अनेक कार्यकर्ते काही कारणामुळे बापुंपासून दुरावू लागले.
- या नाराज कार्यकर्त्यांचा फटका आगामी निवडणु का होऊ नये म्हणून आपल्या कट्टर नाराज कार्यक र्त्यांची नाराजी दूर करणार का याकडे लक्ष लागले आहे.
- सत्ता असतानाही कार्यकर्ते का दुरावू लागले याचा शोध काही बापूंजवळील नेतेमंडळी सध्या घेऊ लागले आहेत.
- मोदींची लाट, भाजप सुसाट
- सांगोल्यात शेकापचे देशमुख घराणे, आमदार शहा जी पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्याभोवती सांगोल्याचे राजकारण फिरत असल्याचे दिसून येत आहे.
- गेल्या काही वर्षापासून देशात सुरू असणारे मोदीं च्या लाटेमुळे भाजपच्या पक्षांतर्गत नवनवीन विविध उपक्रमामुळे, त्यांच्या स्वतःच्या पक्षातील होणाऱ्या कार्यक्रमांमुळे तालुक्यात भाजपची लाट सध्या सुसाट असल्याचे दिसून येत आहे.
- तालुकाध्यक्षपदावरून थेट ग्रामीण जिल्हाध्यक्ष झालेले चेतनसिंह केदार-सावंत हे विधानसभेच्या पक्षीय राजकारणापासून दूर असले तरी पक्षवाढी साठी, पक्ष कार्यक्रमांनाच सध्यातरी ते प्राधान्यक्रम देताना दिसून येत आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space