दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सरकारने लक्ष द्यावे – डॉ देशमुख
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : पुनम जाधव :- शिरभावी ता सांगोला येथिल अर्जून उद्योग समुह व कृषीदत्त परिवार कडुन शिरभावी परिसरातील दुध उत्पादक शेतकरी वर्गाची दिवाळी गोड केली.
- यावेळी ट्रॉफी, बुलेट, सोने, शोकेस कपाट, टिव्ही, फवारणी पंप, शिलाई मशिन, भांडी सेट, इलेक्ट्रि क इस्त्री(183000रू) बुलेट सोडुन आदीसह सर्व शेतकरी वर्गास रोख स्वरुपात डिव्हिडंट (1770 00 रू) वाटप तर कर्मचारी वर्गास दोन तोळे सोने देण्यात आल्याचे अर्जुन उद्योग समुहाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय अर्जुन, संचालिका मिनल अर्जुन, मयुर अर्जुन, मोसम अर्जुन परिवार सांगितले.
- यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमु ख, माजी जिल्हा परिषद सदस्य शाहजी नलवडे, नागनाथ ढोले, दामोदर जगदाळे आदीसह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
- यावेळी डॉ. बाबासाहेब देशमुख बोलताना म्हणाले महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे. पावसाने तर दडी मारली आहे.
- सत्तेसाठी महाराष्ट्रात जनता वेठीष धरली जात आहे. शेतकर्यांच्या मालाला हमी भाव नाही. अन्न, वस्त्र, निवारा प्रमुख गरजा आहेत.
- पण या कडे राज्य सरकारचे लक्ष नाही. शिक्षण, आरोग्य विभागातील हजारो पदे रिक्त आहेत. तर तरूणाच्या हाताला काम नाही.
- बेरोजगार तरूण उपाशी आहे. तर शेतकरी वर्गाचा अधार असलेले दुध आज कवडी मोल दराने घेतले जात आहे.
- मागील वर्षीच्या तुलनेत आज मितीस सात ते आठ रूपयेने दुधाचे दर कमी झाले आहेत. दुधाला शासनाने 35 रू हमी भाव जाहीर केला असताना महाराष्ट्रातील दुध कंपन्या शेतकरी वर्गाचे शोसन करीत आहेत.
- तर बाहेरील राज्यातील दुध उत्पादक कंपनी मात्र शेतकरी वर्गास चांगला भाव देत आहेत.
- हा दुजा-भाव शासनाचे नियंत्रण नसल्याने चालु आहे. दूध दर कमी केले पण सुग्रास चे दर मात्र वाढतच चालले आहेत.
- दुष्काळाने होरपळत चाललेल्या शेतकरी वर्गास न्याय देण्याचे काम शेतक री कामगार पक्षाचे वतीने पुढील काळात केले जाईल असे मत अर्जुन उद्योग समुह शिरभावी शेतकरी मेळाव्यात बोलता ना व्यक्त केले.
- अर्जुन उद्योग समुहाने शेतकरी वर्गासाठी राबविण्या त आलेल्या विविध उपक्रमाचे अध्यक्ष डॉ दत्तात्रय अर्जुन यांचे कौतुक डॉ देशमुख यानी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space