भोत्रा ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचारविरोधी आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी मागे; गटविकास अधिकाऱ्यांकडून चौकशीचे लेखी आश्वासन.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- परंडा तालुक्यातील भोत्रा ग्रामपंचायत अंतर्गत विविध कामांमध्ये लाखो रुप यांचा बोगस कारभार आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सुरू असलेले आमरण उपोषण अखेर तिसऱ्या दिव शी मागे घेण्यात आले.
  • गटविकास अधिकाऱ्यांनी (BDO) या प्रकरणाची १५ दिव सांत समितीमार्फत चौकशी करून पुढील कारवाई कर ण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आप ले आंदोलन मागे घेतले.
  • भोत्रा गावातील ग्रामपंचायत कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते कुलदीप देशमुख व दत्तात्रेयगोळे यांनी दि. २२ जुलै २०२६ पासून प्रशासनाविरोधात आमरण उपोषण सुरू केले होते.
  • आंदोलनाचा आज (दि. २४ जुलै) तिसरा दिवस होता. उ पोषणकर्त्यांची तब्येत आणि गावाची परिस्थिती विचारात घेऊन प्रशासनाने तातडीने पावले उचलली.
  • आज दुपारी रजिंद ज्ञानेश्वर पाटील यांनी गटविकास अधि काऱ्यांशी समन्वय साधून या प्रकरणात मध्यस्थी केली.
  • त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांच्या वतीने आंदोलकांना लेखी आश्वासन पत्र सुपूर्द करण्यात आले.
  • या पत्रात, “भोत्रा ग्रामपंचायतीच्या सर्व विभागांतील कामां ची पुढील १५ दिवसांत एका विशेष समितीमार्फत सखोल चौकशी करण्यात येईल.
  • चौकशी अहवालात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कायदे शीर कारवाई केली जाईल,” असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
  • प्रशासनाच्या या लेखी भूमिकेनंतर उपोषणकर्त्यांनी समा धान व्यक्त करत उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.
  • यावेळी रजिंद ज्ञानेश्वर पाटील, कृषी गटविकास अधिकारी शिंदे, ग्रामसेवक कावळे, ग्रामसेवक वैभव भांडवलकर यां च्यासह गावातील लहान-थोर नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles