सैन्यदलातील निवृत्त कर्नल रघूनाथराव शिंदे यांचे निधन ; चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागावर शोककळा.

  • प्रतिनिधी : चिपळूण : प्रमोद तरळ :- तालूक्यातील दस पटी विभागातील ‘शिंदे’ मराठ्यांच्या पराक्रमाचा गौरवशा ली इतिहास असूनही तो लिहीला गेला नाही याची खंत वाटते.
  • भारतीय सैन्यदलात अधिकारी म्हणून या विभागातील हा ताच्या बोटावर मोजता येतील इतकेच अधिकारी झाले त्यामध्ये कै कर्नल रघूनाथराव शिंदे यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.
  • कर्नल रघुनाथराव आबाजीराव शिंदे यांचे दिनांक ३० मे २०२५ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी अल्पशा आजाराने पुणे येथे नुकतेच निधन झाले.
  • दसपटीतील एक लोकप्रिय कर्नल हरपल्याची दु:खद बात मी सर्वत्र झाल्यामुळे आप्त,स्नेही लोकांमध्ये शोककळा पसरली.
  • कै.रघुनाथराव आबाजीराव शिंदे यांचा जन्म एका उच्च घराण्यात दिनांक ०६/०४/१९३७ रोजी दसपटी विभागा तील पेढांबे या प्रमुख गावात झाला.
  • त्यांचे वडील कै.आबाजीराव हे स्वातंत्र्य पूर्व काळातील इंग्रजाच्या राजवटी मधील एक सुशिक्षित आणि दसपटी मधील सर्व जमिनीची इत्यंभूत माहित असलेले व्यक्तिमत्व होते.
  • तसेच मोडीलिपीचे जाणकार होते तसेच शिक्षणप्रेमी होते. त्याच्या वडिलांनी राजरत्न बडोदे संस्थानचे जनरल नाना साहेब शिंदे यांनी लिहिलेल्या दसपटीचा इतिहास या पुस्त कात संदर्भ म्हणून वापरलेल्या मोडी भाषेतील सर्व सनदा चे मराठीत अनुवाद केले आणि दसपटीचा इतिहास प्रसि द्ध करण्यास मदत केली होती.
  • अशा एका सुशिक्षित वडिलांच्या मार्गदर्शनाखाली कर्नल रघुनाथराव यांनी पुढील आयुष्याची सुरवात केली.
  •  त्यांनी सातवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण पेढांवे या गावात च पूर्ण केले.
  • पुढील शिक्षण चिपळूण तसेच बेळगांव येथून कॅप्टन शंक रराव शिंदे (गाव -कळकवणे) यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले.त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रोत्साहन दिले.
  • ते भारतीय सैन्यात भरती होऊन पुढील उच्च शिक्षण आ र्मी कॅडेट कॉलेज मध्यप्रदेश येथून पूर्ण करून पुढे इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून येथून ट्रेनिंग पुर्ण करून १९६३ साली सेकंड लेफ्टनंट या पदावर आर्मी सेवेत रुजू झाले.
  • त्यांनी त्यांच्या आयुष्यात १९६५ आणि १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात नेतृत्व करून देशाच्या सीमेचे संरक्षण केले आणि विजयश्री मिळवून दिली होती.
  • त्यांच्या आर्मीच्या २७ वर्षाच्या कारकिर्दीत भारतातील स र्व सीमांचे रक्षण करताना कुटुंबीयांसह खडतर प्रवास करत सन १९८९ मधे आर्मी सर्विस मधून निवृत्त झाले.
  • निवृत्तीनंतर पुणे येथे स्थायिक होऊन पुढील आठ वर्षे डि फेन्स मल्टी purposes को ऑपरेटिव्ह सर्विस सोसायटी मध्ये चेअरमन या पदावर काम करून त्या सोसायटीचा कारभार भरभराटीस आणला.
  • त्यांची पत्नी निर्मला ह्या कै मेजर गणपतराव चव्हाण (गा व येगाव) यांची कन्या.मेजर गणपतरावांचे कुटूंबातील बहु संख्य लोक उच्च शिक्षित असून सैन्यदल व अन्य ठिकाणी उच्चपदस्थ आहेत.
  • कर्नल रघुनाथराव यांच्या संपूर्ण यशात वहिनीचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी त्यांच्या तिनही मुलांना चांगले उच्च शि क्षित केले आणि ही तिन्ही मुले उच्च पदावर काम करत आहेत.
  • त्यांचे एक जावई श्री मंगेशराव निकम (ब्रिगेडिअर) हे आ र्मीमधून तर दुसरे जावई श्री राहूल पाटील(मॅनेजर) skf कंपनी मधून निवृत्त झाले आहेत.
  • कर्नल रघुनाथराव यांनी गावातील मुलांचा शैक्षणिक वि कास व्हावा म्हणून नेहमीच पुढाकार घेत असत आणि आर्थिक मदत करून त्यांना प्रेरणा देत असत.
  • अशा या उच्च व्यतिमत्वाचा, शिक्षण प्रसारक संघाने २० २३ मधे पुणे येथे जाऊन स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला होता.
  • देशाची सेवा करत उच्च पदावर पोहचलेल्या कर्नल साहे बांचा सर्व पेढांबे वासियांना नेहमीच अभिमान वाटत असे, आणि सर्व पेढांबे वासी ग्रामस्थ, मुंबई, पुणे येथील नागरि क, त्यांना गावातील एक आदर्श व्यक्ती म्हणून नेहमीच मान देत असत.
  • कर्नल साहेब गावातील प्रत्येक व्यक्तीच्या सुख दुःखाच्या प्रसंगाला उपस्थित रहात असत.सर्व लोक त्यांना प्रेमाणे अण्णा म्हणत असत.ते कुटुंबवत्सल असल्यामुळे त्यांच्या आकस्मिक जाण्यामुळे सर्व आप्तेष्टांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles