
महाराष्ट्र संरक्षण संघटनेतर्फे आज “जन आक्रोश मूक मोर्चा”
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- महाराष्ट्रात सध्याची परिस्थिती पाहता मराठी भाषेला आणि मराठी माणसाला सातत्याने अडगळीची वस्तू म्हणून सहज बाजूला केले जात आहे.
- बाहेरील प्रांतातून महाराष्ट्रात येऊन पैशाच्या जोरावरती स्वतःचे वर्चस्व गाजवणाऱ्या परप्रांतीयांकडून मराठी माण सा वर आणि मराठी भाषेवर सातत्याने हल्ले होत असता ना, राज्य सरकार मात्र मुग गिळून शांत आहे.
- या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या वतीने “जन आक्रोश मूक मोर्चाचे” आयोजन करण्यात येत आहे.
- संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम मराठी भाषिकांना मराठी भाषिक म्हणून एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
- संयुक्त महाराष्ट्राच्या लढया नंतर लढा स्वायत्त महाराष्ट्राचा असा एल्गार महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या वतीने हुतात्मा स्मारक चौकातून देण्यात येणार आहे.
- यासाठी सर्व राजकीय पक्षांना तसेच मराठी भाषेसाठी का र्य करणाऱ्या सर्व संघटनांना, समित्यांना मराठीच्या मुद्द्या वरती एकत्र राहून आवाज उठवण्यासाठी गुरुवार दि १ मे रोजी स. १० वाजता श्री वासुदेव बळवंत फडके चौक, धो बी तलाव, मुंबई ते हुतात्मा स्मारक येथे “जन आक्रोश मू क मोर्चा” चे आयोजन करण्यात आले आहे.
- सर्व मराठी व्यवसायिक, कामगार शिक्षक, महिला, विद्या र्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सं घटनेचे कार्याध्यक्ष ॲड. रवींद्र कुवेसकर यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/