
पारंपरिक इरले, घोंगड्या झाल्या दुर्मिळ; प्लास्टिकच्या वस्तू खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- भात पेरणीला सुरु वात झाली की पूर्वी कोकणात उत्साह संचारत असे घरा तील पुरुषाच्या सोबतीला घरधनीन आणि लहान पोरेही शेतात जात.
- आगोट सरताना पावसाची सुरुवात झाली की नांगरटी साठी लागणाऱ्या ईशाड, रुमणी, कुदळ,खोरे,ढेपला आदी साहित्याबरोबर इरले,घोंगड्या सुध्दा बाहेर काढल्या जात.
- पूर्वी शेत नांगरताना मळ्यामध्ये इरले डोक्यावर घेतलेल्या स्त्रिया व घोंगडी घेऊन जोत हाकणारे जोतये हे चित्र हम खास दिसायचे.
- परंतु आधुनिक काळात प्लास्टिकचा वापर वारेमाप वाढ ला कमी किमतीत मिळणाऱे रेनकोट, प्लास्टिक टोप्या, डो क्यावर घेतले जाणारे कागद यामुळे पारंपरिक इरले व घों गड्या नामशेष होत चालल्या प्लास्टिकच्या वस्तू पावसा पासून बचाव करत असल्या तरी इरले, घोंगड्या पांघरल्या वर मिळणारी ऊब व संरक्षण प्लास्टिक पासून मिळत नाही.
- पळसाची पाने, बांबू आणि अंबाडयाचे सूत (दोरा) आदी वस्तूंपासून इरल्याची वैशिष्ट्यपूर्ण विणली केली जाते त्या मुळे इरले घेतलेल्या स्त्रियांचे पावसापासून संरक्षण तर होतेच.
- परंतु ऊबही मिळते आणि इरले,घोंगडी विकणाऱ्या कारा गीरांना रोजगार मिळत असे परंतु काळाच्या ओघात इरले, घोंगड्यांची जागा प्लास्टिकच्या वस्तूंनी घेतली.
- कोकणातील गावागावात शेतमळ्यावर डोईवर घोंगडी घेतलेला शेतकरीराजा आणि इरले पांघरलेल्या स्त्रिया हे मनमोहक चित्र भावी पिढीला केवल पुस्तकात बघायला मिळेल यात शंका नाही.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/