
आंगले सौंदळकर वाडी येथील धोकादायक ट्रान्स फाॅर्मर व विविध वाडयांवरील गंजलेले पोल बदलण्याची मागणी.
- प्रतिनीधी : आंगले : प्रमोद तरळ :-राजापूर तालुक्याती ल आंगले गावातील अनेक वीज खांब गंजलेले असून वा ड्या मधील विविध पोल बदलले असले अजूनही काही पो ल एकदम जीर्ण झाले असून धोकादायक स्थितीत आहेत.
- सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांनी महावितरण का र्यालय राजापूर तसेच रत्नागिरी येथील अधिकारी यांच्या कार्यालयात अनेक वेळा प्रत्यक्ष भेटून आल्यावर गावाती ल काही वाडीतील थोडेफार पोल बदलण्यात आले आहेत.

- उर्वरीत पोल अजून बाकी आहेत तसेच सौंदाळकरवाडी येथे असलेला इलेक्ट्रिक टांगफॉर्मर अखेरची घटका मोज त असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे ते पावसाळ्या पूर्वी बदलून मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत हे या कामाकरिता सतत पाठपुरावा करत आहेत.
- गावातील सरवणकर वाडी येथील दोन ते तीन खांब तसेच कातलवाडीतील सुभाष तिर्लोटकर यांच्या घराशेजारील दोन पोल अत्यंत जिर्णावस्थेत असून पावसाळ्यात जिवि त व वित्तहानी होण्याची शक्यता आहे.
- तसेच राऊत वरची व खालची राऊतवाडी येथे थ्री फेजची आवश्यकता असून ही मागणी गेल्या तीन चार वर्षांची आहे.
- यामुळे इलेक्ट्रिक उपकरणे आवश्यक तेवढ्या क्षमतेने चा लत नाहीत मंद प्रकाश,कमी दाबाने वीज पुरवठा अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

- गेली चार वर्षे प्रयत्न करुनही महावितरण लक्ष देत नस ल्याने गावातील सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






