
लाटीपाडा व जामकी धरणातून पाणी सोडण्याची मागणी; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन.
- प्रतिनीधी : साक्री : हर्षल ठाकरे :- दि.५ जून काटवाण परिसरात तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमी वर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने साक्री तहसीलदारांना निवेदन देऊन लाटीपाडा व जामकी धरणातून तातडीने पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली.
- संघटनेचे धुळे जिल्हा संपर्क प्रमुख श्री.युवराज दशरथ का कुस्ते यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेद नात काटवाण परिसरातील विहिरींची पाणीपातळी मो ठ्या प्रमाणात खालावल्याने नागरिक व पशुधनाच्या पि ण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे नमूद कर ण्यात आले आहे.

- त्यामुळे लाटीपाडा धरणातील पाणी कालव्याद्वारे काटवा ण परिसरात तसेच जामकी धरणातून पांझरा नदीपात्रात पिण्याच्या पाण्यासाठी तात्काळ सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
- निवेदनात पाटबंधारे विभागाला आवश्यक निर्देश देऊन त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा परिसरातील पाणीटंचाई अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याचेही नमूद कर ण्यात आले आहे.
- यावेळी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे साक्री तालुका युवक अध्यक्ष श्री.हर्षल ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे साक्री तालुकाध्यक्ष श्री.गि रीश नेरकर, श्री. चंद्रशेखर अहिरराव तसेच श्री.उमाकांत अहिरराव उपस्थित होते.
- काटवाण व परिसरातील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्ण य घ्यावा, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






