
मूर गावच्या सुरेंद्र सुतार यांचा प्रामाणिकपणा पाचल बाजारपेठेत हरवलेले पाॅकेट केले परत.
- प्रतिनीधी : पाचल : प्रमोद तरळ :- आजही प्रामाणिक पणा आणि माणूसकी जिवंत आहे. याचे उत्तम उदाहरण मूर गावात पाहायला मिळाले.
- तळवडे येथील रिक्षा चालक कैलास चंद्रकांत रबसे यांचे पाॅकेट काल बुधवार दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी पाचल बाजारपेठेत हरवले होते.
- त्या पॉकेटमध्ये रोख रक्कम,दोन एटीएम कार्ड आणि रि क्षाचे लायसन्स व इतर महत्वाची कागदपत्रे होती.

- पाॅकेट हरवल्याची माहिती मिळताच हा मेसेज सर्व व्हॉट सप ग्रुपवर व्हायरल झाला होता. याच दरम्यान मूर गावा तील युवक सुरेंद्र सुतार यांना ते पॅकेट मिळाले.
- कोणताही मोह न बाळगता सुरेंद्र यांनी पॅकेटमधील काग दपत्रांच्या आधारे शोध घेत रिक्षा चालक कैलास रबसे यांना स्वत: जाऊन ते पाॅकेट परत केले.
- सुरेंद्र यांच्या या प्रामाणिक कृतीचे सर्वत्र कौतुक होत आ हे. पैशाचे आमिष असतानाही त्यांनी दाखवलेल्या प्रामा णिकपणामुळे परिसरातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
- अशा माणसांमुळेच समाजात विश्वास टिकून आहे, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






