
उन्हाळी सुट्टीत सिंधुदुर्गात रिक्षाचालकांची मनमानी, प्रवाशांचे हाल; प्रशासनाचे दुर्लक्ष.
- प्रतिनीधी : सिंधुदुर्ग : प्रमोद तरळ :- कणकवली,नांदगा व, देवगड येथे एप्रिल,मे उन्हाळी सुट्टीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा त गावी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढली आहे.
- मात्र, एसटी बसेसची संख्या मर्यादित असल्याने नाईलाजा ने प्रवाशांना रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे.
- या संधीचा गैरफायदा घेत अनेक रिक्षाचालक अवास्तव भाडे आकारत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

- नऊ आसनी रिक्षामध्ये मिळतील तेवढे प्रवासी कोंबून नेले जातात. त्यावर सामानाचे अतिरिक्त ओझे. यामुळे विशेष तः महिला, लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
- क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्याने अपघाताचा धोकाही वाढला आहे.
- मिटर प्रमाणे भाडे, आत गाव असल्यास त्यावरही योग्य भाडे ठरवुन द्यावे व जेवढी आसनव्यवस्था तेवढेच प्रवासी घेतले जावेत जेणेकरून प्रवास आरामदायक होईल व स र्वाना प्रवासी व रिक्षावाले याना योग्य न्याय मिळेल.
- आर.टी.ओ आणि वाहतूक विभाग याकडे लक्ष देतील का ? प्रवाशांची मागणी आहे की, सरकारने यात तातडीने लक्ष घालून रिक्षांसाठी निश्चित भाडेदर व प्रवासी संख्या ठरवून द्यावी.
- नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कठोर कार वाई करून लोकांचे हाल थांबवावेत.
- विशेष बाब म्हणजे सध्या मीटर प्रमाणे भाडे आकारले जा त नाही किंवा कुठे जाण्यासाठी किती पैसे घेतले जातील याचा काही कुठेही उल्लेख नाही.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






