
वृक्ष लागवड काळाची गरज – विलास (बाबा ) रेगे.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मा ध्यमिक विद्यामंदिर ओझर प्रशालेत दि. 30 जुलै 2025 रोजी वृक्षारोपण चा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
- विद्यावर्धिनी ओझर संस्थेचे अध्यक्ष मा.विलास विनायक रेगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

- या कार्यक्रमाला पालक प्रतिनिधी श्री.सुयोग रेगे सौ मान सी मंगेश गुरव सौ.जाधव माजी संस्थाध्यक्ष श्री.दत्ताराम जयराम गुरव शिक्षकआणि शिक्षक इतर कर्मचारी व प्रशा लेचे विद्यार्थी उपस्थित होते.
- शाळेचे मुख्याध्यापक श्री मुरलीधर राजाराम खानविलकर यांनी प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीसाठी नि धी संकलनासाठी केलेल्या आवाहनानुसार विद्यार्थ्यांनी 32500 रुपये इतका निधी जमवला.

- त्यातून सुमारे वीस हजार रुपयाची 125 रोपे शाळेसमोरी ल बागेत व परिसरात लावण्यात आली उर्वरित रक्कम पुढील उपक्रमासाठी राखून ठेवण्यात आली आहे.
- यावेळी प्रशालेतील शिक्षक श्री चंद्रकांत पाटील व अंगण वाडी सेविका सौ मानसी मंगेश गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रशाळेतील शिक्षिका सौ पूनम कांबळे यांच्या निरीक्षणाखाली वृक्ष लागवड करण्यात आली.

- त्याचप्रमाणे प्रशाळेतील शिक्षकेतर कर्मचारी श्री अनिल दळवी श्री संदेश यादव व आशिष कोकरे यांच्या सहकार्या ने व निरीक्षणाखाली वृक्ष लागवड करण्यात आली.
- अध्यक्ष भाषणात संस्था अध्यक्ष श्री विलास रेगे यांनी आ जच्या काळात वृक्षांची लागवड करणे किती महत्त्वाचे आ हे हे सांगताना असे सांगितले की पुढील पिढीसाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे.

- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री मुरली धर खानविलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री चंद्रकां त रघुनाथ पाटील यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











