
चांदणी’च्या कॅनाल काठी वृक्ष लागवड करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा; अमर भाई शेख यांचे तहसीलदारांना निवेदन.
- प्रतिनिधी : फारूख शेख :- सध्या वाढत असलेली उन्हा ची तीव्रता आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास थांबव ण्यासाठी परांडा तालुक्यातील चांदणी तलावाच्या कॅनाल लगत असलेल्या अतिरिक्त जागेवर तातडीने वृक्ष लागवड करण्यात यावी.
- अशी मागणी मराठवाडा संपर्क प्रमुख अमर भाई शेख यां नी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
- मागणी मान्य न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
- तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या उन्हाची लाट मोठी असून पर्यावरणाचे संतुलन राखणे का ळाची गरज बनली आहे.

- राज्य शासनाच्या वतीने वृक्ष लागवडीसाठी विविध योज ना राबवल्या जातात.
- परांडा तालुक्यातील पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत ये णाऱ्या चांदणी तलावातून जाणाऱ्या कॅनालच्या दोन्ही बा जूंना मोठ्या प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध आहे.
- या जागेचा सदुपयोग करून तेथे वृक्षारोपण केल्यास निस र्गाचे रक्षण होईल आणि वाढत्या तापमानाला आळा घाल ण्यास मदत होईल.
- येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी या जागेवर वृक्ष लागवड केल्या स पावसाच्या पाण्यावर ही झाडे जगतील आणि त्यांचे संवर्धन होईल.
- त्यामुळे संबंधित विभागाने यावर तातडीने कार्यवाही करा वी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
- या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, वनमंत्री, धाराशिव जिल्ह्या चे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
- यानिवदनावर छावा सघटनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख अ मर भाई शेख यांची स्वाक्षरी आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






