‘आपले सरकार सेवा केंद्रे’ बंदच; उद्घाटनानंतर महिना उलटूनही प्रत्यक्ष सेवा नाहीत- महेश कदम 

  • प्रतिनिधी : नितीन राणे :-वसई-विरार महानगर पालिके ने दि. २८ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अ धिनियमाच्या दशकपूर्ती निमित्ताने‘सेवा हक्क दिन’मोठ्या जल्लोषात साजरा केला होता.
  • यावेळी महानगरपालिका मुख्यालयासह सर्व प्रभाग समि ती कार्यालयांमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्रांचे’ उद्घाटन करण्यात आले होते.
  • मात्र, उद्घाटनास महिना उलटूनही या केंद्रांमधून प्रत्यक्ष से वा सुरू झाल्या नाहीत,ही बाब नागरिकांमध्ये तीव्र नाराजी चा विषय बनली आहे.
  • सेवा हक्काचा शासकीय दिवस साजरा करताना नागरिकांना वेळेवर सेवा देण्याची शपथ घेण्यात आली होती.
  • मात्र प्रत्यक्षात एकही केंद्र कार्यरत नसल्याचे चित्र असून, केंद्रांमध्ये सेवा घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.
  • यासोबतच उद्घाटनावेळी जाहीर करण्यात आलेली अधि कृत वेबसाईटही कार्यरत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
  • “हे केवळ औपचारिक उद्घाटनाचे नाटक ठरत आहे,” असा संतप्त सवाल महेश कदम यांनी मनपा प्रशासन केला आहे.
  • शिवाय लोकसेवा हक्क कायद्याच्या उद्देशालाच हरताळ फासल्याचे कदम यांनी म्हटले आहे.या पार्श्वभूमीवर कदम यांनी एक निवेदन देऊन सर्व ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ तात्काळ कार्यरत करावीत.
  • उद्घाटनावेळी जाहीर करण्यात आलेली वेबसाईट तत्काळ सुरु करावी. सेवा केंद्रे प्रत्यक्षात सुरू करून करदात्यांना सेवा देण्यात यावी.
  • अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे विरार शहर सरचिट णीस आणि माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे वसई विरार जिल्हा अध्यक्ष महेश कदम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles